मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये भारतीय संघ आपला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळत आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नवा इतिहास रचला आहे. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या ११ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
रोहितला इथवर पोहोचण्यासाठी १२ धावांची गरज होती. त्याने आपले हे लक्ष्य बांगलदेशविरुद्धच्या सामन्यात सहज पूर्ण केले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रोहितने ३६ बॉलवर ४१ धावा केल्या. यात ७ चौकारांचा समावेश होता.
रोहित शर्मा १०वा फलंदाज आहे ज्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीयमध्ये ११ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. सोबतच असे करणारा तो चौथा भारताचा फलंदाज आहे. रोहितच्या आधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि विराट कोहलीने ही कामगिरी केली आहे.
रोहित शर्मा एकदिवसीय आंतरराष्ट्रीयमध्ये ११ हजार धावा पूर्ण करणारा दुसरा वेगवान फलंदाज आहे. रोहितने आपल्या २६१ वनडे डावामध्ये ११ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. रोहितने सचिनला याबाबतीत मागे टाकले आहे. त्याने २७६ डावांत ११ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…