लाहोर : पाकिस्तामधील बलुचिस्तान प्रांतात लाहोरला जाणाऱ्या बसवर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी आधी बस थांबवली आणि बसमधील सर्व प्रवाशांचे ओळखपत्र तपासली. त्यानंतर सात प्रवाशांची गोळी घालून हत्या केली. नैऋत्य बलुचिस्तानमधील बरखान जिल्ह्यात हा हल्ला झाला.
बलुचिस्तानमधील बरखान जिल्ह्यात सुमारे ४० सशस्त्र पुरूषांच्या गटाने अनेक बस आणि वाहने थांबवली, ओळखपत्रे तपासली आणि त्यानंतर बसमधून सात प्रवाशांना बाहेर काढले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये सर्व सातही पंजाब प्रांतातील आहेत. या भागाचे सहाय्यक आयुक्त खादिम हुसेन यांनी सांगितले की, बरखानला दक्षिण पंजाबमधील डेरा गाझा खान शहराशी जोडणाऱ्या महामार्गावर हा हल्ला झाला. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही आणि हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, या परिसराला वेढा घातला आहे पण हल्लेखोर पळून गेले आहेत. शुक्रवारी कोळसा खाण कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला लक्ष्य करून झालेल्या बॉम्ब हल्ल्याच्या काही दिवसांनंतर ही घटना घडली.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…