कणकवली : आपण हवाई मार्गे मुंबई-गोवा महामार्गाची (Mumbai Goa highway) पाहणी केली असून, हा महामार्ग पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी दिले.
देवगडचे लोकप्रिय माजी आमदार स्व. जनार्दन मोरेश्वर उर्फ आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोप समारंभाला ना. गडकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा उल्लेख केला आणि हा मार्ग पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन दिले.
तसेच, जलवाहतूक तोट्याची ठरत असल्याने सी-प्लेन हा उत्तम उपाय आहे. ही वाहतूक कोकण किनारपट्टीवर कोणताही निधी खर्च न करता सुरू करता येईल. यासाठी आपण पुढाकार घ्यावा, मी तुम्हाला योग्य ती मदत करेन असे आश्वासन मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना दिले आहे.
त्याचप्रमाणे, वॉटर कार हा प्रकल्पही अंतिम टप्प्यात आहे. रस्त्यावरून पाण्यात आणि पाण्यातून पुन्हा रस्त्यावर फिरणारी बस लवकरच कोकण किनारपट्टीवर सुरू करू, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.
आप्पासाहेब गोगटे यांचे स्वप्न असलेला इळये-वरंडवाडी पूल केंद्रीय मार्ग निधीतून उभारण्यासाठी आवश्यक निधी देऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…