मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि महाकुंभ मेळा २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी सामावून घेण्यासाठी, पश्चिम रेल्वेने वलसाड-दानापूर आणि साबरमती-बनारस दरम्यान विशेष भाड्यावर दोन जोड्या महाकुंभ मेळा विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार असणार आहे. विशेष गाडी क्रमांक ०९०१९ वलसाड-दानापूर महाकुंभ मेळा विशेष गाडी रविवार २३ फेब्रुवारी २०२५ रोजी वलसाड येथून ०८:४० वाजता सुटेल आणि दानापूरला दुसऱ्या दिवशी १८:०० वाजता पोहोचेल.
त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ०९०२० दानापूर – वलसाड महाकुंभ मेळा विशेष सोमवार, २४ फेब्रुवारी २०२५ रोजी दानापूर येथून २३:३० वाजता सुटेल आणि बुधवारी वलसाड येथे ९:३० वाजता पोहोचेल. ही गाडी नवसारी, भेस्तान, नंदुरबार, अमळनेर, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, चुनार, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर आणि आराह स्थानकावर थांबेल. या ट्रेनमध्ये एसी २-टायर, एसी ३-टायर, स्लीपर क्लास आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…