नवी मुंबई : रेल्वेप्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पनवेलहून ठाण्याकडे येणारी लोकलसेवा ठप्प झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे लोकलसेवा ठप्प झाल्याचं समजत आहे. यामुळे कामगार वर्गाला याचा फटका बसणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास नेरूळमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेलहून ठाण्याकडे येणाऱ्या गाड्या रुळावरच थांबल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. परिणामी प्रवाशांची रुळावरूनच पायपीट सुरु झाली आहे. रेल्वेचे तंत्रज्ञ घटनास्थळी पोहचले असून दुरुस्तीचे काम सुरु आहे. मात्र या समस्येमुळे नेरुळ स्थानकावर गर्दी पाहायला मिळाली आहे. सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला याचा फटका बसणार आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…