Diva Water Cut : दिवा शहरातील पाणी पुरवठा १४ फेब्रुवारी रोजी ८ तास बंद राहणार

Share

ठाणे : मुख्य जलवाहिनीवरील गळती थांबविण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० ते सायं ६.०० या वेळेत ८ तासाकरीता दिवा शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ठाणे शहरातील दिवा प्रभाग समिती अंतर्गत निळजे येथून दिवा येथे प्रभाग क्र. २७ व २८ करीता ५०० मी.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. या जलवाहिनीवर उसरघर रेल्वे कल्व्हर्ट पलावा सिटी कंपाऊन्ड येथे मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. त्यामुळे या परिसरात वारंवार कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्या अनुषंगाने मुख्य जलवाहिनीवर झालेली गळती थांबविणे अत्यावश्यक आहे, ही गळती थांबल्यावर दिवा प्रभाग समिती अंतर्गत आगासन, बेतेवडे, गणेश नगर, बेडेकर नगर, म्हसोबा नगर, शांती नगर, मुंब्रा देवी कॉलनी, साबे गाव व दिवा पश्चिम आदी परिसरातील पाण्यासंबधित तक्रारी कमी होतील.

या मुख्य जलवाहिनीवरील गळती बंद करण्याकरीता दि. १४.०२.२०२५ रोजी सकाळी १०.०० ते सायं ६.०० या वेळेत ८ तासाकरीता दिवा शहरातील प्रभाग क्र.२७ व २८ करीता होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाणी पुरवठा पूर्ववत सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Recent Posts

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

18 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

51 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

2 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago