महाकुंभमुळे प्रयागराजमध्ये १५ फेब्रुवारीपर्यंत ८वीपर्यंतच्या शाळा बंद

Share

प्रयागराज: प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभमध्ये दररोज कोट्यावधीच्या संख्येने भाविक स्नानासाठी येत आहे. येथील मोठ्या प्रमाणातील गर्दी पाहता प्रयागराजमध्ये ८वीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रचंड गर्दीमुळे प्रयागराजमध्ये आठवीपर्यंतच्या शाळा आता १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहे. आठवीपर्यंतच्या शाळा आता १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून आठवीपर्यंतचे वर्ग हे ऑनलाईन पद्धतीनेच घेतले जात आङे.

बुधवारी संध्याकाळी दोन कोटींहून अधिक भाविकांचे स्नान

महाकुंभमध्ये पाचवे स्नान पर्व माघी पोर्णिमेला होते. यावेळेस बुधवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल २ कोटीहून अधिक लोकांनी गंगा आणि संगमामध्ये पवित्र डुबकी घेतली. या दरम्यान स्नान करणाऱ्या भक्तांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टि करण्यात आली.

१३ जानेवारीपासून ते आतापर्यंत ४८.२५ कोटीहून अधिक लोकांनी केले स्नान

मेळावा प्रशानाच्या आकडेवारीनुसार बुधवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल २ कोटीहून अधिक लोकांनी संगमात तसेच गंगेमध्ये स्नान केले. महाकुंभची सुरूवात १३ जानेवारीला झाली आहे. आतापर्यंत ४८.२५ कोटीहून अधिक लोकांनी येथे स्नान केले आहे.

Recent Posts

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

18 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

1 hour ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

1 hour ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

2 hours ago