राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याचे निधन

Share

अयोध्या : श्रीराम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे ८५ व्या वर्षी ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. आचार्य सत्येंद्र दास यांना ब्रेन हॅमेरज ३ फेब्रुवारी रोजी झाले. तब्येत बिघडल्याचे लक्षात येताच त्यांना लखनऊच्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स (एसजीपीजीआयएमएस) या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांनी बुधवार १२ फेब्रुवारी रोजी अखेरचा श्वास घेतला. आचार्य सत्येंद्र दास यांचे अंत्यसंस्कार अयोध्येत केले जातील. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक्स पोस्ट करुन शोक व्यक्त केला आहे.

आचार्य सत्येंद्र दास यांच्यावर एसजीपीजीआयएमएसमध्ये न्यूरॉलॉजी विभागातील (वॉर्ड) हाय डिपेंडन्सी युनिट अर्थात एचडीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची माहिती प्रदीप दास यांनी दिली. प्रदीप दास हे आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य आहेत. प्रदीप दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, आचार्य सत्येंद्र दास यांनी बुधवार १२ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता अखेरचा श्वास घेतला. सत्येंद्र दास यांच्या पार्थिवावर गुरुवार १३ फेब्रुवारी २०२५ रोजी अयोध्येत शरयू नदीकिनारी अंत्यसंस्कार केले जातील. काही दिवसांपूर्वी एसजीपीजीआयएमएस रुग्णालयाने काढलेल्या एका मेडिकल बुलेटिनमध्ये आचार्य सत्येंद्र दास यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास आहे असल्याचाही उल्लेख होता.

कोण आहेत आचार्य सत्येंद्र दास ?

आचार्य सत्येंद्र दास ३३ वर्षांपासून राम मंदिराच्या सेवेत होते. ते दररोज प्रभूरामाच्या मूर्तीची पूजा करत होते. तत्कालीन खासदार विनय कटियार, विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन प्रमुख अशोक सिंघल या दोघांनी पाठिंबा दिला आणि १ मार्च १९९२ रोजी सत्येंद्र दास यांची राम मंदिरात मुख्य पुजारी म्हणून नियुक्ती झाली होती. सत्येंद्र दास यांनी १९७५ मध्ये संस्कृत विद्यालयातून आचार्य ही पदवी घेतली होती. ते काही काळ एका महाविद्यालयात संस्कृत व्याकरणाचे सहायक अध्यापक (सहायक शिक्षक) होते.

Recent Posts

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

12 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

32 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

52 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

54 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

2 hours ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

2 hours ago