कटक : बाराबती स्टेडियममध्ये झालेला इंग्लंड विरुद्धचा एकदिवसीय सामना भारताने चार गडी राखून जिंकला. या विजयासह भारताने इंग्लंड विरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २ – ० अशी जिंकली. कटकच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माची बॅट तळपली. त्याने ९० चेंडूत सात षटकार आणि बारा चौकार मारत ११९ धावांची खेळी केली. रोहितच्या शतकामुळे भारताचा विजयाचा मार्ग सुकर झाला. या सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार रोहित शर्माला देण्यात आला.
मागील अनेक दिवसांपासून क्रिकेटप्रेमी वाईट कामगिरीसाठी रोहित शर्मावर टीका करत होते. अखेर रोहितने टीकाकारांना बॅटद्वारे प्रत्युत्तर दिले. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये १२, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३२ आणि टी २० मध्ये ५ अशी ४९ आंतरराष्ट्रीय शतके झळकावण्याची कामगिरी केली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४३०२, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०९८७ आणि टी २० मध्ये ४२३१ अशा एकूण १९ हजार ५२० धावा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केल्या आहेत.
कटकच्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडने ४९.५ षटकांत सर्वबाद ३०४ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने ४४.३ षटकांत ६ बाद ३०८ धावा करुन सामना जिंकला. भारताने इंग्लंड विरुद्धचा नागपूरमधील एकदिवसीय सामना चार गडी राखून आणि कटकमधील सामनाही चार गडी राखून जिंकला. लागोपाठ दोन विजय मिळवणारा भारतीय संघ आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमध्ये बुधवार १२ फेब्रुवारी रोजी विजयाची हॅटट्रिक करण्यास उत्सुक असेल तर इंग्लंड व्हाईट वॉश टाळण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…