मुंबई : उदय कोटक यांना कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक म्हणून अनेकजण ओळखतात. आता ते मुंबईतील फ्लॅट खरेदीमुळे चर्चेत आले आहेत. अब्जाधीश बँकर उदय कोटक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांनी संयुक्तपणे सुमारे २०२ कोटी रुपये खर्चून मुंबईत समुद्रकिनारी १२ आलीशान फ्लॅट खरेदी केले.
वरळी सी फेस परिसरात शिव सागर इमारतीत उदय कोटक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांनी संयुक्तपणे १२ आलीशान फ्लॅट खरेदी केले. खरेदी केलेल्या फ्लॅटची नियमानुसार रजिस्ट्रेशन फी आणि स्टँप ड्युटी भरुन नोंदणी करण्यात आली आहे. कोट्यवधींच्या फ्लॅट खरेदीत कोटक कुटुंबाने दोन लाख ७० हजार रुपये प्रति चौरस फूट या दराने व्यवहार केला आहे.
दक्षिण मुंबईतील वरळी सी फेस भागात उद्योगपती, व्यावसायिक, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, आयटी तज्ज्ञ अशा अनेक कोट्यधीश मुंबईकरांची घरं आहेत. यात आता कोटक कुटुंबाच्या १२ फ्लॅटची भर पडली आहे. कोटक कुटुंबाने केलेला सौदा हा मुंबईत झालेला सध्याच्या काळातला सर्वात मोठा घर खरेदीचा आर्थिक व्यवहार आहे.
शिव सागर इमारतीत कोटक कुटुंबाने ९ मे २०२४ रोजी ७३५ चौरस फुटांचा एक फ्लॅट खरेदी केला. यानंतर परिसर आवडल्याचे कारण देत कोटक कुटुंबाने शिव सागर इमारतीत आणखी ११ फ्लॅटची खरेदी केली. या ११ फ्लॅटची नोंदणी ३० जानेवारी २०२५ रोजी झाली. कोटक कुटुंबाने तळमजला, पहिला मजला आणि दुसरा मजला येथील एकूण १२ फ्लॅट खरेदी केले. या व्यवहाराद्वारे कोटक कुटुंबाने ७ हजार ४१८ चौरस फुटांचा परिसर २०१.८८ कोटी रुपये खर्चून खरेदी केला आहे. फ्लॅट उदय कोटक, त्यांची पत्नी पल्लवी, मुलगे धवल आणि जय तसेच वडील सुरेश यांच्या नावावर आहेत.
कोटक महिंद्रा ही भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी बँक आहे. उदय कोटक यांचे आता बँकेत २६ टक्के शेअर्स आहेत. ते देशातील दहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत नागरिक आहेत.
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…