मुलांच्या भांडणात मोठ्यांची एंट्री, ११ जण झाले जखमी

Share

पाटणा: बिहारच्या नवादा येथे मुलांच्या भांडणात मोठ्यांनी हस्तक्षेप केला आणि त्याचे परिणाम वाईट झाले. दोन्ही कुटुंबादरम्यान चांगलाच वाद वाढला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत दोन्ही कुटुंबातील ११ जण जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल केले. ही घटना कादिरगंज येथे घडली. येथे काही लहान मुलांमध्ये बाचाबाची झाली. या लढाईत मोठ्यांनी भाग घेतला. त्यांच्यातही वाद सुरू झाला. लाठ्या-काठ्या, विटा, दगड यांनी मारामारी सुरू झाली. या हाणामारीत दोन्ही कुटुंबातील महिलांसह ११ जण जखमी झाले.

जखमींमध्ये एका कुटुंबातील ७ जण तर दुसऱ्या कुटुंबातील ४ जण जखमी झाले आहेत. या जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी पौरा गावात सरस्वतीच्या मूर्तीच्या विसर्जनादरम्यान या दोन्ही कुटुंबातील मुलांमध्ये बाचाबाची झाली. यावरून वाद झाला होता. तेथील लोकांनी हा वाद मिटवला होता. याबाबत पंचायतही भरवण्यात आली आणि प्रकरण संपवण्यात आले. मात्र त्यानंतर एका कुटुंबातील लोकांनी दुसऱ्या कुटुंबावर हल्ला केला.

जखमींमध्ये एका कुटुंबातील पौरा गावाचे निवासी सोमर चौधरींचे पुत्र गौरे चौधरी, दिनेश चौधरी, छोटू कुमार, शौरभ कुमार, बाले चौधरींचा पुत्र सुरेंद्र कुमार, सोनरवा देवी, दिव्यांशी कुमारी जखमी झाले आहेत. यातील गोरे चौधरी यांची स्थिती गंभीर आहे. तर दुसऱ्या कुटुंबातील पौरा गावाचे निवासी मेवा लाल यांचे पुत्र संजय राम, दीपक सिंह यांचे पुत्र कुंदन कुमार, गौतम सिंह आणि पंकज कुमार हे जखमी झालेत.

Recent Posts

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

8 minutes ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

28 minutes ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

42 minutes ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

57 minutes ago

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

2 hours ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

2 hours ago