मुंबई(विशेष प्रतिनिधी)– महापालिका जी दक्षिण विभागातील महालक्ष्मी येथील जे. आर . बोरिचा रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत मुंबई महापालिकेने या मार्गावरील १५० झोपड्या तथा बांधकामांवर बुलडोझर चढवत कारवाई केली. अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आल्याचे येथील ३०० मीटर परिसराची पदपथ चालण्यास मोकळी झाली आहे. महापालिकेच्या जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली.
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. मागील महिन्यात लोअर परळ येथील गणपतराव कदम मार्गावरील अनधिकृत शेडस्, दुकानांसमोरील वाढीव बांधकाम आदींवर मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांनी धडक कारवाई करत पदपथ, रस्ता मोकळा केल्यानंतर महालक्ष्मी येथील बोरीच्या मार्गांवरील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चढवला.
सीताराम मिल म्युनिसिपल स्कूलकडे जाणाऱ्या या रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणामुळे येथील रहिवाशी, पादचारी, विद्यार्थी आणि पालक यांची प्रचंड गैरसोय व्हायची त्यामुळे या ठिकाणी असलेल्या अनाधिकृत बांधकामांच्या तक्रारींची दखल घेत जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांनी परिमंडळ २ चे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. येथील सुमारे १५० झोपड्या तथा अतिक्रमणे बुधवारी हटवण्यात आली.
एन एम जोशी पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि पोलीस समन्वयाने आणि सहकार्याने ही अतिक्रमणे हटवण्यात आली. या ६० पुरुष आणि ४० महिला पोलिस कर्मचारी उपस्थित होते. तर महापलिकचे २० अभियंते आणि ५० बीएमसी कामगारांनी या कारवाईत भाग घेतला होता. जे आर बोरिचा रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या ३०० मीटर लांबीच्या पदपथावरील अतिक्रमण काढून टाकण्यात आल्याने या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…