परभणी: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी आज गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षात प्रवेश केला आहे. नांदेड येथील एका कार्यक्रमात कदम यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे सेनेत दाखल होण्याचा निर्णय घेतला.श्री. कदम हे खासदार संजय जाधव यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
विशाल कदम हे बऱ्याच दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या मशालला सोडचिठ्ठी देऊन धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चा होती. अखेर आज गुरुवारी sत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश घेतला. यावेळी त्यांच्या समवेत गणेश कदम, माऊली भोसले, नवनाथ पारवे आदी परभणी जिल्ह्यातील काही कार्यकर्ते उपस्थित होते.कदम यांनी सेनेच्या ‘उबाठा’ गटाकडून नुकतीच गंगाखेड विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. निवडणुकीतील पराभवानंतर ते अस्वस्थ होते. राजकीय पर्यायाच्या शोधात असताना त्यांनी सत्ताधारी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कदम यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या आजी-माजी जिल्हाप्रमुखांनी गेल्या काही दिवसात पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय लागोपाठ घेतला आहे. सुरुवातीला संजय साडेगावकर यांनी आपल्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आता अजीत पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. जालना जिल्ह्याचे शिवसेनेचे प्रमुख ए.जे. बोराडे यांनी गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पक्षाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. बोराडे यांचा मंठा हा तालुका परभणी लोकसभा मतदारसंघात येतो. परभणी लोकसभा मतदारसंघात लागोपाठ तीन जिल्हाप्रमुखांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे.
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…