मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. २ फेब्रुवारीला खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारतीय संघाने तब्बल १५० धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेवर ४-१ असा कब्जा केला.
वानखेडेच्या टी-२० सामन्यातील विजयाचा हिरो ठरला सलामीवीर अभिषेक शर्मा. अभिषेक शर्माने ५४ बॉलवर १३५ धावा लुटल्या.यात त्याने १३ षटकार आणि ७ चौकार लगावले. अभिषेक शर्माने यानंतर गोलंदाजीतही कमाल केली. त्याने तीन धावा देत दोन विकेटही मिळवल्या.
अभिषेक शर्मा असा पहिला भारतीय क्रिकेटर आहे ज्याने एखाद्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक ठोकण्यासोबतच विकेटही मिळवल्या. अभिषेक शर्मा भारताकडून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावसंख्या करणारा फलंदाज आहे. सोबतच अभिषेक भारतासाठी एखाद्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाजही आहे.
श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…