Raj Thackeray : थोरात पडलेच कसे? अजितदादांचे ४२ आमदार कसे निवडून आले?

Share

राज ठाकरेंची निवडणूक निकालावर शंका

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत संशय व्यक्त करत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ईव्हीएम मशीनबाबत अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मनसेच्या मुंबईतील मेळाव्यात राज ठाकरे यांनी यासंदर्भात भाष्य केले. यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीच्या अतिप्रचंड यशामागे ईव्हीएममधील फेरफार असल्याचा आरोप केला होता. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाशी जवळीक असलेल्या राज ठाकरे यांनीही ईव्हीएम मशिनच्या विश्वासर्हतेबद्दल शंका उपस्थित केली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचा उल्लेख केला.

बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते, सातवेळा आमदार झालेत. ही आठवी टर्म होती, त्यांची. सातवेळेला ७० ते ८० हजारांच्या ते मताधिक्याने निवडून यायचे. ते यावेळी १० हजार मतांनी पराभूत झाले. उद्या अनेक लोक बोलतील राज ठाकरेंचा पराभव झाला, त्यामुळे ते बोलत आहेत. मी काय बोलतो, अख्खा महाराष्ट्र बोलत आहे. सत्तेत असलेल्या अनेकांचा मला फोन आले, त्यांनाही शॉक बसलाय. भाजपाला १३२ जागा मिळाल्या, गेल्यावेळी १०५ जागा होत्या. २०१४ ला १२२ जागा त्यांनी जिंकल्या होत्या. पण अजित पवार ४२ जागा, चार-पाच जागा येतील की नाही, असे वाटत असताना त्यांना ४२ जागा मिळाल्या. जे इतके वर्षे महाराष्ट्रात राजकारण करत आले त्यांना १० जागा मिळतात, ही न समजण्यापलीकडची गोष्ट आहे. लोकसभेला काँग्रेसचे सर्वाधिक १३ खासदार निवडून आले. एका खासदाराच्या खाली सहा आमदार येतात निवडून. त्यांचे १५ आमदार निवडून आले. शरद पवारांचे ८ खासदार निवडून आले होते, त्यांचे १० आमदार येतात. लोकसभेला ज्या अजित पवार यांचा एक खासदार निवडून येतात त्यांचे ४२ आमदार चार महिन्यात निवडून आले. काय झालं, कसं झालं, हा संशोधनाचा विषय आहे. या मतदानावर जाऊ नका, लोकांनी आपल्याला मतदान केले आहे, ते फक्त आपल्यापर्यंत आलेले नाही, केलेले मतदान कुठेतरी गायब झाले. असे राज ठाकरे यांनी म्हटले. अशाप्रकारे निवडणुका लढवायच्या असतील तर त्या न लढवलेल्याच बऱ्या.

यावेळी राज ठाकरे मनसेचे कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे माजी आमदार राजू पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघात १४०० लोकवस्ती असलेले गाव आहे. या गावातील लोक राजू पाटील यांनाच मतदान करतात. या १४०० लोकांच्या गावात राजू पाटलांना शून्य मते मिळाली. अख्ख्या गावातून एक मत नाही पडत, जिथून राजू पाटलांना १४०० मते पडायची सगळी, तिकडून एक मत नाही पडत. तिकडे मराठवाड्यातील एक पदाधिकारी आहे, तो नगरसेवक होता, त्याला त्याच्या भागातून ५५०० मते पडली होती. आता विधानसभेला तो उभा होता, त्याला या निवडणुकीत २५०० मते पडली. अनेक असे निर्णय आहेत महाराष्ट्रात ज्यावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचाही विश्वास नाही, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

47 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

1 hour ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

2 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

3 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

3 hours ago