मुंबई : सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं पुन्हा सुनावणी होणार आहे. सुरुवातीपासून ही सुनावणी सुरू होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयात नव्या मुख्य न्यायमूर्तींची नियुक्ती झाली आहे. यानंतर याचिकाकर्त्यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या याचिकांवर नव्यानं सुनावणी घेण्याची विनंती केली होती. ही विनंती मान्य झाली आहे. सुनावणीसाठी नवीन विशेष पूर्णपीठ स्थापन केले जाणार आहे. याचिकाकर्त्यांनी रजिस्ट्रारकडे याचिकेसाठी नव्याने नोंदणी करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
आधीच्या न्यायमूर्तींच्या समोर याचिकांची ६० टक्के सुनावणी झाली होती. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती या पदावर आलोक आराधे या नव्या न्यायमूर्तींची नियुक्ती झाली. यामुळे याचिकांची नव्याने आणि सुरुवातीपासून सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली. ही मागणी मान्य झाली आहे. उच्च न्यायालयाने मागणी मान्य केल्यामुळे सुनावणी नव्याने सुरू होणार आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा न्यायालयातील खटला निकाली निघण्यास आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…