वॉशिंगटन : अमेरिकन अब्जाधीश एलॉन मस्क यांना भारतात गेल्या काही वर्षांपासून स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सेवा लाँच करायचे आहे. मात्र, भारत सरकार काही केल्या त्यांना परवानगी देत नव्हते. अखेर मस्क यांनी नमते घेतले असून मस्क यांनी भारताच्या सर्व अटी मान्य केल्या आहेत. त्यामुळे स्टारलिंकचा भारतातील सेवा सुरु करण्याचा रस्ता मोकळा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मस्क यांच्या स्टारलिंक लाँच करण्यासाठी भारत सरकारने कोणतीही सूट दिलेली नाहीय. त्यामुळे सरकारच्या अटी मान्य करत स्टारलिंक त्याच्या ध्येयाच्या आणखी जवळ आला आहे. सरकारच्या सर्व अटी आपल्याला मान्य असल्याचे पत्र मस्क यांच्या स्टारलिंकने केंद्राकडे सुपूर्द केले आहे. यानंतर आता स्टारलिंकला स्पेक्ट्रम वाटप केले जाणार आहे. त्याची बीटा चाचणी देखील आता सुरु केली जाणार आहे. स्टारलिंकच्या मदतीने स्मार्टफोन युजर्सना मोबाईल टॉवरशिवाय फोन सेवा उपलब्ध होणार आहे. स्टारलिंक स्मार्टफोन युजर्ससाठी प्रचंड फायद्याचे ठरणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून, स्टारलिंक सातत्याने आपले सॅटेलाइट कम्युनिकेशन नेटवर्क वाढवत आहे. TweakTown च्या अहवालानुसार, वापरकर्ते आता २५०-३०० Mbpsच्या वेगाने इंटरनेट वापरू शकतात. एलॉन मस्कचे हे तंत्रज्ञान यशस्वी झाले तर तंत्रज्ञान क्षेत्राचे भविष्य नक्कीच पूर्णपणे बदलून जाईल याचा दूरसंचार उद्योगावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने सॅटेलाइट स्पेक्ट्रम आणि त्याच्या किंमतीची प्रक्रिया आधीच अंतिम केलेली आहे. यामुळे भारतात लवकरच उपग्रह सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत अमेझॉनची Kuiper ही सॅटेलाईट सर्व्हिसही उतरण्याची शक्यता आहे. जिओ आणि एअरटेलही या स्पर्धेत येण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप कोणते अपडेट हाती आलेले नाही.
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…