Pandharpur Vitthal Temple : नवविवाहित जोडप्यांना मिळणार विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन!

Share

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी (Pandharpur Vitthal Temple) राज्यभरातून लाखो भाविक येतात. तसेच विवाह झाल्यानंतर नवविवाहित जोडपे देवदर्शनासाठी जात असतात. अशातच पंढरपुरातील विठुरायाचे दर्शनला जाणाऱ्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने नवविवाहित जोडप्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ज्यामुळे लग्नानंतर विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्यांना दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीमध्ये दिव्यांगांच्या बरोबरच नवविवाहित जोडप्यांना व्हीआयपी दर्शन देण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी नवविवाहित जोडप्यांना विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या रांगेत उभे राहावे लागत होते. मात्र आता या निर्णयामुळे पंढरपूरमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्याला विठुरायाचे लागलीच व चांगले दर्शन घेता येणार आहे.

स्थानिक नागरिकांसाठीही वेळ निश्चित

त्याचबरोबर पंढरपुरातील स्थानिक नागरिकांना देखील सकाळी सहा ते सात आणि रात्री दहा ते साडेदहा वाजेपर्यंत दर्शनाला सोडले जाणार आहे. अर्थात यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी कमी होऊ शकेल. याची अंमलबजावणी गुरुवारपासून म्हणजे २९ जानेवारीपासून करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

Recent Posts

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

5 minutes ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

20 minutes ago

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

1 hour ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

2 hours ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

6 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

6 hours ago