मुंबई: मागील काही दिवसांत सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या सदस्यांना सायबर सुरक्षेबाबत जागरूक करणे आणि सुरक्षित डिजिटल व्यवहारासाठी ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद आणि एमकेसीएलच्या वतीने महिला सायबर साक्षर अभियान संयुक्तपणे राबविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार १०० दिवस कृती कार्यक्रम अंमलबजावणी अंतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या माध्यमातूनच महिलांसाठी सायबर साक्षर हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील उमेद अभियानांतर्गत ६८ महिला प्रभाग संघाशी जोडलेल्या २६ हजार बचत गटात सहभागी असणार्या अडीच लाख महिलांना एमकेसीएलच्या अधिकृत अध्ययन केंद्रांमध्ये (एएलसीएस) जाऊन सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे.
महिला दिनापर्यंत यातील किमान १ लाख महिलांना सायबर साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १ फेब्रुवारी ते ८ मार्चदरम्यान सायबर सुरक्षा जागरूकता अभियान राबविण्यात येणार असून, त्यांची नोंदणी २६ ते ३१ जानेवारीदरम्यान tinyurl. com/ ssadrdapune या लिंक करावी लागणार आहे.
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…