रायगड : थंडी सुरू झाली की खवय्यांना वेध लागतात ते वालाच्या शेंगांच्या पोपटीचे. पोपटी म्हटलं की गावठी वालाच्या शेंगा किंवा पावट्याच्या शेंगा, या गावठी शेंगांची नुकतीच गोरेगाव माणगाव बाजारपेठेत आवक झाली असून चिकन प्रेमी नी पोपटीला पसंती देत आहेत आणि या गावठी शेंगाना बाजारपेठेत मागणी देखील चांगली आहे.
विदर्भात, खानदेशात ज्याप्रमाणे ज्वारी व बाजरीच्या कणसांना भाजून केलेला हुरडा प्रसिद्ध आहे, त्याप्रमाणेच जिल्ह्यामध्ये गावठी वालाच्या शेंगांची वैशिष्ट्यपूर्ण व लज्जतदार पोपटी प्रसिद्ध आहे. वालाच्या शेंगा भामरुडाच्या (भांबुर्डी) पाल्यात मडक्यामध्ये मोकळ्या आगीवर विशिष्ट पद्धतीने शिजवल्या जातात. यालाच पोपटी असे म्हणतात. काही ठिकाणी मडक्याऐवजी पत्र्याचा डब्बासुद्धा वापरला जातो. पोपटीत वालाच्या शेंगांबरोबर कांदा, बटाटा, रताळी तसेच अंडी, चिकन, मसाळी व चिंबोऱ्या घालून लज्जत वाढवली जाते. ठिकठिकाणी शेतावर तसेच मोकळ्या जागेवर, फार्म हाऊस व घराबाहेर मोकळ्या जागेत आदी ठिकाणी या पोपटीची धूम पाहायला मिळते.
अलीकडे थंडी सुरू झाल्यानंतर शेतात लावली जाणारी ही पोपटी ग्रामीण भागात सुरू झाली असून थंडीच्या दिवसात मित्र, कुटुंबातील सदस्य खास कडधान्याच्या शेतात जाऊन तयार झालेल्या वालाच्या शेंगा, अंडी, मसाला लावलेले कोंबडीचे मांस किंवा बिन मांसाची फक्त शेंगांची, मडक्यात मांडणी करून शेतातील गवऱ्या, सुके शेण, पेंढा किंवा गवत यांच्या सहाय्याने भाजणी करतात. ठराविक वेळ उष्णता दिल्यानंतर मडक्यातील शेंगा, अंडी, मांस शिजले जाते. असे शिजलेले मांस, शेंगा इत्यादी पदार्थ अतिशय चविष्ट लागतात. या मडक्यातील शेंगांची व अंड्याची चव उत्कृष्ट असल्याने ग्रामीण व शहरी भागात गेल्या काही दिवसांपासून पोपटीचे कार्यक्रम सुरू झाले असून अनेक खवय्ये आपापल्या मित्रपरिवारासह शेतात व उघड्या माळरानावर एकत्र येत पोपटी लावत आहेत. या हंगामातील वालाच्या शेंगा २०० तर घाटमाथ्यावरून मुबलक येत असलेल्या पावट्याच्या शेंगांना ग्राहकांची पसंती देखील मिळत असून १०० रुपये किलोने पावट्याच्या शेंगा भाजी बाजारात मिळत आहेत.
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…