Wardha News : ५१ म्हशींची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला, पाच जण अटकेत

Share

वर्धा : अवैधरित्या वाहतूक करणारे कंटेनरमध्ये जनावरे भरून घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना अटक करून ४७ लाख ७५ हजार रुपंयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. तसेच जनावरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वोदय गोशाळा पडेगाव येथे दाखल करण्यात आले.

४७ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकने समृद्धी महामार्गावर विरुळ परिसरात नाकाबंदी केली. पोलिसांनी एका कंटेनरची तपासणी केली. त्यात म्हैस वर्गीय ५१ जनावरांना अवैधरीत्या वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी १२ लाख ७५ हजार रुपयांची म्हैस वर्गीय ५१ जनावरे, तसेच कंटेनर असा ४७ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पुढील तपास सुरू

ही जनावरे अकबर अली जलाउद्दीन रा. ईलीपाकोनथ्थु, जि. त्रिवेंद्रमपुरम (केरळ) (पसार) याच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिस स्टेशन पुलगाव येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सागरकुमार कवडे यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, हमीद शेख, सचिन इंगोले, राजेश तिवस्कर, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, अभिषेक नाईक, शिवकुमार परदेशी, अखिलेश इंगळे, रितेश गेटमे यांनी केली.

Recent Posts

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

20 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

53 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

2 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago