‘उद्धव ठाकरे गटाचे ३ खासदार आणि पाच आमदार शिवसेनेच्या वाटेवर’

Share

दावोस : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी स्विर्झर्लंडमधील दावोस येथे असलेले महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक व्हिडीओ सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे ३ खासदार आणि पाच आमदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचा दावा केला. लवकरच उद्धव ठाकरे गटाला जबर धक्का बसेल, असेही उदय सामंत म्हणाले. याआधी शिवसेनेचे लोकसभेतील खासदार राहुल शेवाळे यांनीही उद्धव ठाकरे गटाला धक्का बसणार असल्याचे भाकीत केले होते. दोन शिवसेना नेत्यांच्या या वक्तव्यांमुळे उद्धव ठाकरे गटाचे काय होणार यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या सुमारास उदय सामंत यांचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या राजकीय भवितव्याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. उदय सामंत यांनी काँग्रेसचे निवडक आमदारही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना पक्षात फूट पडणार नाही, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केला आहे. उद्योगमंत्र्यांना फक्त राजकारण करायचे असेल तर त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावोसमधून परत महाराष्ट्रात पाठवून द्यावे,असेही संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभा
एकूण सदस्य २८८
भाजपा १३२
शिवसेना ५७
राष्ट्रवादी काँग्रेस ४१
उद्धव ठाकरे गट २०
काँग्रेस १६
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस १०
समाजवादी पक्ष २
इतर १०

इतर १० जणांपैकी जनसुराज्य शक्तीचे २, राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीचा १, राष्ट्रीय समाज पक्षाचा १, राष्ट्रीय शाहू विकास आघाडीचा १ अशा पाच सदस्यांनी राज्यातील महायुती सरकारला पाठिंबा दिला आहे. तर समाजवादी पक्षाचे २, एमआयएमचा १, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा १, शेतकरी कामगार पक्षाचा १ अशा पाच जणांनी विरोधात बसण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पाच इतर मिळून २३५ आमदारांची महायुती सत्तेत आहे. तर ५१ आमदार विरोधात आहेत.

Recent Posts

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

7 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

49 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

52 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

1 hour ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

2 hours ago