Ram Gopal Varma : दिग्दर्शक राम गोपाल वर्मांना ३ महिन्यांची शिक्षा, नॉन-बेलेबल वॉरंट जारी

Share

मुंबई : दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांना मुंबईतील अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने चेक बाउन्स प्रकरणात ३ महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, तब्बल ७ वर्षे चाललेल्या सुनावणीनंतर कोर्टाने मंगळवारी राम गोपाल वर्मा यांच्याविरुद्ध नॉन-बेलेबल वॉरंट जारी केले आहे. रिपोर्टनुसार, वर्मा यांना नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या कलम १३८ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले, जे बँक खात्यात अपुरी रक्कम किंवा खाते बंद असल्यामुळे चेक बाउन्स झाल्यास दंडाची तरतूद करते.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना तक्रारदाराला नुकसानभरपाई म्हणून ३.७५ लाख रुपयांची रक्कमही भरावी लागणार आहे. जर त्यांनी ही रक्कम ३ महिन्यांच्या आत भरली नाही, तर त्यांना आणखी ३ महिन्यांची कैद होईल.

राम गोपाल वर्मा यांच्या कंपनीविरोधात २०१८ मध्ये श्री नावाच्या कंपनीने महेशचंद्र मिश्रा यांच्यामार्फत चेक बाउन्सचा गुन्हा दाखल केला होता. जून २०२२ मध्ये, वर्मा यांना वैयक्तिक बाँड आणि ५,००० रुपयांच्या जामीन रक्कमेनंतर जामीन मंजूर करण्यात आला होता.

सजा सुनावणाऱ्या मॅजिस्ट्रेट यांनी स्पष्ट केले की, “दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ४२८ अंतर्गत कोणताही सेट-ऑफ लागू होणार नाही,” कारण राम गोपाल वर्मा “खटल्याच्या दरम्यान कोणत्याही प्रकारच्या ताब्यात नव्हते.”

रिपोर्टनुसार, सजा सुनावणीच्या वेळी राम गोपाल वर्मा उपस्थित नव्हते आणि अद्याप या प्रकरणाचा तपशीलवार निर्णय बाकी आहे. मात्र, त्यांनी या प्रकरणावर एक्स (ट्विटर) वर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलेय की, “माझ्या आणि अंधेरी कोर्टाच्या बातम्यांच्या संदर्भात, मी स्पष्ट करू इच्छितो की हा माझ्या एका माजी कर्मचाऱ्याशी संबंधित २.३८ लाख रुपयांच्या रकमेचा ७ वर्षांपूर्वीचा मुद्दा आहे. माझे वकील या प्रकरणाचा अभ्यास करत आहेत आणि हे प्रकरण न्यायालयात असल्याने, मी यावर पुढे काही बोलणार नाही.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी २०२४ मध्ये ‘व्यूहम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, जो आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांच्या अकाली निधनावर आधारित आहे. तसेच, ते नाग अश्विन यांच्या ‘कल्की २८९८ ई.’ या चित्रपटात एका कॅमिओ भूमिकेत झळकणार आहेत.

Recent Posts

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

60 minutes ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

1 hour ago

भारताकडे तेल, गॅसचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…

1 hour ago

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

1 hour ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

2 hours ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

4 hours ago