मुंबई: ट्रायच्या आदेशानंतर जिओ आणि एअरटेलने आपले स्वस्त प्लान्स लाँच केले आहेत. कंपनी केवळ कॉलिंग आणि एसएमएसचे ऑप्शन आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडत आहेत. या क्रमामध्ये एअरटेलने आपले दोन नवे रिचार्ज प्लान्स ४९९ रूपये आणि १९५९ रूपयांचे प्लान्स लाँच केले आहेत. दोन्ही प्लान्स अनुक्रमे ८४ दिवस आणि ३६५दिवसाच्या व्हॅलिडिटीसह येतात.
४९९ रूपयांच्या प्लानबद्दल बोलायचे झाल्यास यात तुम्हाला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. हा प्लान अनलिमिटेड कॉलिंग आणि ९०० एसएमएस फायद्यांसह येतो. यात तुम्हाला डेटा मिळणार नाही. अतिरिक्त फायद्यांच्या नावावर कंपनी अपोलो २४ बाय ७ सर्कल आणि फ्री हॅलो ट्यूनचा अॅक्सेस देत आहे.
तर दुसरा प्लान १९५९ रूपयांचा आहे. यात तुम्हाला एका वर्षाची म्हणजेच ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यात तुम्हाला डेटा बेनेफिट मिळत नाही. या रिचार्ज प्लानमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंग आणि ३६०० एसएमएस संपूर्ण व्हॅलिडिटी देत आहे. सोबतच अतिरिक्त फायदेही मिळत आहेत.
डेटा वापरासाठी तुम्हाला दुसरे प्लान्स खरेदी करावे लागतील. ट्रायने टेलिकॉम ऑपरेटर्स कंपन्यांना केवळ कॉलिंग आणि एसएमएसचे प्लान लाँच करण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर कंपनीने हे पाऊल उचलले आहेत. ऑथॉरिटीचे म्हणणे आहे की अनेक युजर्स असे आहेत जे डेटाचा वापर करत नाही. त्यांनाही डेटाचा प्लान घ्यावा लागतो. अशा युजर्ससाठी वेगवेगळे प्लान लाँच करावे लागतील.
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…