Narayan Rane : पुरस्कार सोहळ्यांमधून समाजातील उद्योजक वृत्ती वाढीस लागावी – नारायण राणे

Share

क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळातर्फे खासदार नारायण राणे “मराठा गौरव” पुरस्काराने सन्मानित

मुंबई : पुरस्कार सोहळे हे फक्त पुरस्कार सोहळे न राहता त्यातून समाजातील व्यक्ती एकत्र येऊन आपल्या विचारांचे आदान प्रदान करून त्यातून उद्योजक निर्माण होतील तेव्हा तेच खरे त्या पुरस्कारांचे यश असेल असे मनोगत रत्नागिरी – सिंधुदुर्गचे भाजपा खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केले. क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या (मुंबई) वतीने देण्यात येणारा यावर्षीचा मराठा गौरव पुरस्कार खासदार नारायणराव राणे यांना रविवारी दादर येथे तावडे कौटुंबिक स्नेहमेळाव्यात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. त्याचप्रमाणे तावडे समाज कुलभूषण पुरस्कार पुणे येथील ज्येष्ठ शिक्षणमहर्षी उज्वल जयवंतराव तावडे यांना देण्यात आला.

यावेळी नारायण राणे म्हणाले की, आपल्याच समाजातील कर्तुत्ववान व विधायक कामे करणाऱ्या लोकांचा आपल्या समाजाकडून सत्कार होणे ही बाब पुढे जाण्यास प्रेरणा देतात. माझं काम निश्चितच कौतुकास पात्र असल्यानेच तावडे समाजाने आपला सत्कार केला म्हणून त्यांनी तावडे समाजाचे आभार मानले. मात्र आता येथेच न थांबता तावडे समाजाने आता एकत्रित येऊन उद्योजकता कशी वाढीस लागेल व तावडे हे जास्तीत जास्त उद्योजक कसे बनतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी इच्छा व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की मुंबई कोकणात आहे पण कोकणात मुंबई कुठे आहे ? केंद्रात मुंबईचा वाटा ३३ टक्के आहे. पण मराठा समाजाचे योगदान मात्र त्यात एक टक्का आहे. ते वाढले पाहिजे. त्यासाठी समाजातून उद्योजक निर्माण झाले पाहिजे, असेही ते म्हणाले. मुंबईत आज अनेक उद्योजक आहेत. मात्र मराठी माणसाची संख्या खूप कमी आहे. आपल्यात कुठलीही कमतरता नाही. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपण कोणतेही ध्येय साध्य करू शकतो, असा मंत्र देतानाच याबाबतीत मी कधीही आपल्याला पूर्णपणे सहकार्य करण्यास तयार असल्याचे
त्यांनी सांगितले.

दरम्यान, ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या प्रमुख उपस्थिती झालेल्या या सोहळ्यात मंडळाचे अध्यक्ष दिनकरराव हिरोजी तावडे, सरचिटणीस सतीश तावडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. याचवेळी मंडळाच्या वतीने आदर्श कार्यकर्ता पुरस्कार चंद्रशेखर श्रीधर तावडे (वाडा), बाळकृष्ण रघुनाथ तावडे (वाल्ये), उदय पांडुरंग तावडे (वाल्ये) यांना देण्यात आला . तर कृषी पुरस्कार विवेक विश्वनाथ तावडे (वाडा), राजेश परशुराम तावडे (नाधवडे) यांना प्रदान करण्यात आला आहे. तर उद्योजक पुरस्कार : स्नेहा अनिल तावडे (नाटक ), क्रीडा : रिधान सुनील तावडे (देवधामापूर), ठाणे येथील स्टेशन मास्तर केशव सदानंद तावडे (वाल्ये), आशा स्वयंसेविका : अनुश्री अनंत तावडे, एसीपी महेश रमेश तावडे, डाक पोस्ट कार्यालय उपअधीक्षक . मनाली राजेंद्र तावडे, डाक पोस्ट कार्यालय सहाय्यक उपअधीक्षक प्रफुल्ल महादेव तावडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. २०२४ च्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तावडे कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.

Recent Posts

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

2 minutes ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

13 minutes ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

32 minutes ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

1 hour ago

IND vs PAK Tension: प्रत्येक हल्ल्याला चोख उत्तर देऊ, जयशंकर यांनी EUला दिली पाकिस्तान हल्ल्याची माहिती

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…

2 hours ago

भारताने लाहोर-सियालकोटमध्ये केला हल्ला, पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्धवस्त

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…

3 hours ago