वानखेडे स्टेडियमची पन्नाशी!

Share

मुंबई (मानसी खांबे) : वानखेडे स्टेडियम उभारण्याआधी मुंबईत क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या मालकीचं ब्रेबॉर्न हे एकमेव क्रिकेट स्टेडियम होते. वानखेडे स्टेडियमच्या आधी मुंबईतील सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने CCI (क्रिकेट क्लब ऑफ इंडिया)च्या अंतर्गत असलेल्या या स्टेडियमवर खेळले जायचे. त्यानुसार १९७२ साली महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि क्रिकेटप्रेमी बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी या मैदानात सामना खेळवण्याचे ठरवले. मात्र त्यावेळी सीसीआयचे अध्यक्ष ख्यातनाम क्रिकेटपटू विजय मर्चंट यांनी वानखेडे यांची सामना खेळवण्याची मागणी फेटाळून लावली. यावेळी शब्दाला शब्द लागून वातावरणही गरम झाले होते. दरम्यान एका मराठी माणसाच्या केलेला अपमानामुळे या वागणुकीचा बदला घेण्यासाठी ५० वर्षापूर्वी मुंबईतील चर्चगेट येथे अवघ्या १३ महिन्यात वानखेडे स्टेडियम उभारण्यात आले.

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला आज १९ जानेवारी रोजी ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे वानखेडे स्टेडियमवर भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये क्रिकेटचा देवता म्हणजेच सचिन तेंडुलकर यासह मुंबई क्रिकेट संघाचे तसेच भारतीय क्रिकेटपटूंनी हजेरी लावली आहे. तसेच अजय-अतुल आणि अवधुत गुप्ते यांचा गाण्यांचा कार्यक्रम देखील होत आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून वानखेडेच्या पन्नाशीच्या कार्यक्रमादरम्यान मुंबईचे खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पुष्पगुच्छ आणि वानखेडे स्टेडियमची प्रतिकृती खेळाडूंना देण्यात आली. सर्वप्रथम सुनील गावस्कर, त्यानंतर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, डायना इडुलजी यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान स्टेजवर सचिन तेंडुलकर याने स्टेडियम वरील काही आठवणी सांगितल्या. मैदानातील पहिला दिवस ते निवृत्ती दिवसापर्यंतच्या सर्व आठवणी सचिनने जागवल्या. तसेच मैदानात मित्रांसोबत केलेली धमालमस्तीही सांगितली. यावेळी चाहत्यांकडून केल्या जाणाऱ्या ‘सचिन- सचिन’च्या घोषणांनी संपूर्ण स्टेडियम दुमदुमून गेले.

Recent Posts

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

1 hour ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

1 hour ago

भारताकडे तेल, गॅसचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…

1 hour ago

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

2 hours ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

2 hours ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

4 hours ago