Health: थंडीच्या दिवसांत खाऊनपिऊन वजन करा कमी

Share

मुंबई: थंडीच्या दिवसांत आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. खासकरून या मोसमात वजन वाढणे ही सामान्य समस्या आहे. थंडीच्या दिवसांत वजन घटवण्याची प्रक्रिया मंदावते. सगळ्यात मोठी बाब म्हणजे या दिवसांमध्ये आपली फिजीकल अॅक्टिव्हिटीही कमी होते. तसेच पाणीही कमी प्यायले जाते. तसेच खाणेपिणेही वाढते..

सूर्याचा प्रकाश कमी झाल्याने शरीरात व्हिटामिन डीची कमतरता जाणवते. या सर्व कारणांमुळे मेटाबॉलिज्मवरही परिणाम होतो. अशातच तुम्ही थंडीच्या दिवसांत वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तसेच बेली फॅट कमी करायाचे असेल तर आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत.

घरात एक्सरसाईज करा

जर थंडीच्या दिवसांत जिम जायची इच्छा होत नसेल अथवा फिरायला जायला जमत नसेल तर अॅक्टिव्ह राहण्यासाठी घरच्या घरी व्यायाम करा. घरातच योगा करा. योग सगळ्यात चांगला व्यायाम आहे. सूर्य नमस्कार करा. ब्रिस्क वॉक करा. दोरीउड्या, पायऱ्या चढणे, डान्स करणे अशा व्यायामांमुळे तुम्ही थंडीच्या दिवसांतही अॅक्टिव्ह राहू शकता.

थोडे थोडे खा

एकदम तीनवेळा भरपेट जेवण्यापेक्षा थोडे थोडे खा. यामुळे दीर्घकाळ तुमचे पोट भरलेले राहील आणि जंक फूड कमी खाल. तसेच जेवण स्किप करू नका.

भरपूर पाणी प्या

थंडीच्या दिवसांत आपण पाणी कमी पितो. मात्र ही चूक केल्याने शरीरावर त्याचा परिणाम होतो. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीर डिहायड्रेट होते यामुळे मेटाबॉलिज्मचा वेग मंदावतो आणि शरीरासाठी वजन घटवणे कठीण होते. थंडीच्या दिवसांत तुम्ही कोमट पाण्याचे सेवन करू शकता. यामुळे शरीरातील फॅट ककमी होऊन रक्तसंचलन व्यवस्थित होण्यास मदत होते. यासोबतच फॅट कमी करण्यासाठी तुम्ही कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून प्या. याशिवाय तुम्ही यात चिया सीड्सही मिसळू शकता.

Recent Posts

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

10 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

12 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

48 minutes ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

59 minutes ago

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

3 hours ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

3 hours ago