मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील १-३ अशा पराभवानंतर आता नव्या वर्षात टीम इंडिया नव्या मिशनसाठी तयारी करत आहे. भारतीय संघ आता घरातच इंग्लंडविरुद्ध पाच टी-२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही एकदम खास मालिका असणार आहे.
खरंतर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील कोणत्याही फॉरमॅटमधील पहिली मालिका आहे. या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादव भारताचे नेतृत्व करणार आहे.
रोहित आणि कोहलीच्या अनुपस्थितीत त्याच्या खाद्यांवर इंग्लंड संघाला हरवण्याची जबाबदारी आहे. दरम्यान, कोहली आणि रोहितच्या निवृ्त्तीनंतर भारतीय संघाने अनेक टी-२०, वनडे सामने खेळलेत. मात्र इंग्लंडविरुद्धची ही पहिलीच मालिका असणार आहे.
गेल्या वेळेस भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये सामना रंगला होता. तेव्हा सेमीफायनलमध्ये हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. त्यावेळेस रोहित शर्माच्या हाती नेतृत्व होते. २७ जून २०२४मध्ये गुयानामध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघाने जोस बटलरच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाला ६८ धावांनी मात दिली होती. त्यानंतर भारतीय संघ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला होता. तेथे त्यांनी दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी हरवत खिताब जिंकला होता.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…