नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरूपती मंदिरात बुधवारी वैकुंठ द्वार दर्शन तिकीच केंद्राजवळ झालेल्या चेंगराचेंगरीदरम्यान ६ भक्तांचा मृत्यू झाला आहे. खरंतर, सकाळपासून हजारोच्या संख्येने भक्तगण वैकुंठ द्वार दर्शन टोकनसाठी तिरूपतीच्या विविध तिकीट केंद्रांवर रांगेमध्ये उभे होते. वैकुंठ द्वार दर्शन दहा दिवसांसाठी खोलण्यात आले आहेत. यामुळे टोकनसाठी हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले होते.
यावेळी चेंगराचेंगरी झाल्याने एकच गोंधळ झाला. या चेंगराचेंगरीदरम्यान चार जणांचा मृत्यू झाला. यात एका महिलेचाही समावेश आहे. परिस्थिती बिघडत असलताना तिरूपती पोलिसांनी मोर्चा सांभाळला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दर्शनासाठी टोकनच्या रांगेत ४ हजार लोक होते. स्थितीबाबत मंदिर समितीचे चेअरमन बीआर नायडू आपात्कालीन बैठक करत आहेत.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरूपतीमध्ये विष्णू निवासमजवळ तिरूमाला श्रीवारी वैकुंठ द्वारामध्ये दर्शनासाठी टोकन घेताना झालेल्या चेंगराचेंगरीदरम्यान चार भक्तांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांनी या घटनेप्रकरणी दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी यात जखमी झालेल्यांना देण्यात येणाऱ्या उपचारांबद्दल माहितीही घेतली.
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…