लांजा : मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात पाईपलाईन फुटल्याने लांजा नगरपंचायतीच्या तीन प्रभागात पाण्याची बोंबाबोंब झाली आहे.
गेल्या चार दिवसांपासून या तीनही प्रभागांमध्ये पाण्याचा थेंब न आल्याने प्रभाग क्रमांक ४, ८ आणि ९ मधील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, लांजा शहरातून जाणार्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणार्या संपादित जागेतील इमारती, दुकाने, टपर्या गुरूवारी पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आल्या. गुरूवारी सकाळपासून ही कारवाई करण्यात आली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तसेच राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली होती.चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जागेवर टपरीधारक, दुकानदार यांनी बस्तान बसवले होते.
तर अनेक वर्षापासून रखडलेल्या उड्डाणपुलाच्या खांबाच्या कामाने वेग घेतल्यानंतर पुन्हा एकदा शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने मागील काही दिवसांपासून वेग घेतला आहे. मात्र शहरात संपादित जागेतच अनेक ठिकाणी टपर्या, दुकाने उभारण्यात आलेली होती. तर काही ठिकाणी चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या जागेतील अनेक इमारती मालकांना आणि दुकानदारांना त्यांच्या जागेचा मोबदला दिला गेलेला नसल्याने इमारती, दुकाने हलवण्याबाबत अडथळा केला जात होता. लांजा शहरातील ४७ प्रकरणात अशा प्रकारे इमारत मालकांनी आपल्या बांधकामांवर हातोडा फिरविण्यास नकार दिला होता. त्यामुळे शहरात चौपदरीकरणाचे काम रखडले होते.
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…