मुंबई : मुंबईत दादर येथील एका विदेशी कंपनीने हजारो गुंतवणूकदारांना लाखो रुपयांना चूना लावला (Fraud) असून कंपनीला टाळे लावून मालक फरार झाला आहे. यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी आता टाहो फोडला आहे.
बाजारात पैसे डबल करणा-या अनेक कंपन्या येतात आणि लोकांचे पैसे डुबवून जातात. अशीच एक रशियन कंपनी टोरेस (Torres) मुंबईत दादर येथील शिवाजी मंदिर समोरील गल्लीत वर्षभरापूर्वीच आली होती. पाच हजार स्केअर फूटाचे आलिशान ऑफीस ब्लेझर घालून स्टाफ, येण्या-जाणा-याला बिसलरी पाणी, कॉफी, चहा मोफत. सुरवात त्यांनी महिना चार टक्के व्याजाने केली. पण गेल्या महिन्यात ती एकदम ११ टक्के महिना केली. लाखो लोकांनी पैसे गुंतवले. अगदी ५ हजारापासून लाखांपर्यंत.
पण शनिवारी रात्रीपासून याला टाळ लागलं आहे. सुरुवातीला कंपनीकडून काही हप्ते देण्यात आले पण गेल्या दोन आठवड्यांपासून कंपनीकडून काहीच माहिती दिली जात नसल्याचं गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे. आणि आता या कंपनीबाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी केली आहे.
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…