सोलापूर : बार्शी तालुक्यासह लगतच्या जिल्ह्यात वाघ, बिबट्याची दहशत सुरू असतानाच उक्कडगाव येथे गत काही महिन्यापासून माकडाच्या सुरू असलेल्या उच्छादाबाबत वन विभागाला जाग आली. या माकडाला पकडण्यासाठी वनविभागाच्या वतीने उक्कडगाव येथे ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात येणार असून, माकडाला पकडून वन अधिवासात सोडले जाणार आहे. माकडाच्या बंदोबस्ताबाबत वन विभागाला निवेदन देऊनही वन विभागाकडून कार्यवाही होत नसल्याचा आरोप होत होता. माकडाच्या वर्तवणुकीमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
सदर उपद्रवी माकड दिवसा थेट घरांत घुसून अन्नधान्याची, दूध, दुधाचे कँड, गहू, ज्वारी आदीचे नुकसान करत आहे. या माकडाने गावातील महादेव मंदिरात व मंदिरावर धुमाकूळ घालत चक्क मंदिराचा कळस हलवून नुकसान केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.ग्रामपंचायतीने काही महिन्यांपूर्वीच या मोकाट माकडाच्या बंदोबस्तासाठी वनविभागाला निवेदन दिले होते. मात्र, तरीही या पत्रावर कोणतीच कारवाई न झााल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात होता. माकडाने पाच ते सहा कुत्र्यांना पकडून फिरवत आपटून ठार मारल्यामुळे गावकरीही भयभीत झाले आहेत.
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…