सोलापूर : दत्त जयंतीपासून नाताळ, सलग शासकीय सुट्या, मार्गशीर्ष महिना आणि नववर्ष आरंभाचे औचित्य साधून अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळांनी भाविकांसाठी अविरतपणे महाप्रसादाची सेवा बजावली आहे. गेल्या १५ दिवसांत सुमारे १५ लाख भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्यात आल्याची माहिती अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी दिली.
अक्कलकोटनिवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिराला लागून असलेले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ३७ वर्षे अखंडपणे कार्यरत आहे. मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले यांच्या अधिपत्याखाली सेवा कार्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे.
विस्तारित महाप्रसादालयासह यात्री निवास, भक्त निवास आदी स्वरूपात श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी सेवासुविधा उपलब्ध असून या सेवाकार्याने प्रभावित होऊन गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांनी प्रभावित होऊन अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले यांना दोन अद्ययावत किमती मोटारी स्नेहापोटी दिल्या होत्या. त्यांच्या पश्चात मंगेशकर कुटुंबीयांनी अन्नछत्र मंडळाबरोबर जिव्हाळा जपला आहे. अन्नछत्र मंडळाने अलीकडे गोव्यातही सेवाविस्तार केला आहे.
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…