Weather Update : उत्तर भारतात थंडीची लाट

Share

नवी दिल्ली : संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथील डोंगराळ भागापासून ते दिल्लीच्या मैदानी भागापर्यंत सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. दिल्लीत शुक्रवारी पाऊस पडल्यामुळे थंडीची तीव्रता वाढली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवार ३० डिसेंबर रोजी दिल्लीत सकाळी धुकं पडेल. किमान तापमान सहा अंश से. तर कमाल तापमान १८ अंश से. असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दिल्लीत रविवारी किमान तापमान १३ अंश से. आणि कमाल तापमान १८ अंश से. होते. दिल्लीत धुक्यामुळे दृश्यमानता कमी होईल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चालकांनी धुक्यातून वाहने चालवणे टाळावे आणि आवश्यकताच असेल तर हेडलाईट सुरू ठेवून आणि वेग नियंत्रणात ठेवून वाहन चालवावे असे आवाहन दिल्ली पोलिसांच्या वाहतूक विभागाने केले आहे. धुक्याचा परिणाम रेल्वे आणि विमानांच्या वाहतुकीवरही होण्याची शक्यता आहे.

हिमवृष्टी आणि पावसामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथील पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. पर्यटक वाढल्यामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथे प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

सध्या जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहार या सर्वच राज्यांमध्ये थंडीची तीव्रता वाढली आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि विमान वाहतूक मंदावली आहे. वाहतुकीचा वेग मंदावल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

वातावरण बदलल्यामुळे पर्यटनस्थळी गर्दी वाढली आहे. आणखी काही दिवस थंडीची तीव्रता कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Recent Posts

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

3 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

37 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

1 hour ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago