नवी दिल्ली: आपल्या आर्थिक सुधारणांच्या जोरावर अर्थव्यवस्थेला प्रगतीच्या पथावर अग्रेसर करणारे भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरूवारी रात्री निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे पार्थिव रात्रीच त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर केंद्राकडून सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. देशात ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त समजताच काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार प्रयिगं गांधी , भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा हे एम्समध्ये पोहोचले. यावेळेस काँग्रेसची कर्नाटकच्या बेळगावात सुरू असलेली कार्यकारिणीची बैठकही रद्द करण्यात आले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे ही तातडीने एम्सच्या दिशेने निघाले आणि गुरूवारी मध्यरात्री पोहोचले.
एनसीपी(सपा)अध्यक्ष शरद पवार यांनीही गुरूवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हटले, देशाने एक महान अर्थशास्त्री, दूरदर्शी सुधारक आणि राजकीय नेता गमावला आहे. ते पुढे म्हणले, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दु:ख झाले. आपल्या देशाने महान अर्थशास्त्रांपैकी एक दूरदर्शी सुधारक आणि जागतिक नेत्याला गमावले आहे. त्यांची पोकळी सतत जाणवेल. त्यांनी घालून दिलेला आदर्श अनेक पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायक असेल. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर तेलंगणा सरकारने शुक्रवारी सरकारी कार्यालये आणि शैक्षणिक संस्थाने बंद राहणार आहे. एक आठवड्याचा राष्ट्रीय दुखवटा जाहीरही करण्यात आला आहे.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…