Crime News : सहा लग्न करून आणि सासरच्यांना लुबाडून पळालेल्या तरुणीला सातव्या लग्नाआधी अटक

Share

नवी दिल्ली : अविवाहीत असलेल्या पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे नंतर लग्न करायचे. लग्नानंतर संधी साधून सासरच्यांना लुबाडून फरार व्हायचे, या पद्धतीने एका मागून एक तब्बल सहा विवाह केलेल्या तरुणीने सातव्या विवाहाची तयारी सुरू केली होती. या विवाहाआधीच पोलिसांनी तरुणीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या तरुणीचे नाव पूनम असे आहे. पूनम अविवाहीत असलेल्या पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत लग्न करत होती. या कटात पूनमसोबत संजना गुप्ता आई म्हणून सहभागी होत होती. विमलेश वर्मा आणि धर्मेंद्र प्रजापती हे दोघे अविवाहीत पुरुषांची माहिती मिळवून ती पूनम आणि संजना यांना पुरवत होते. या माहितीआधारे कट रचून पूनम अविवाहीत असलेल्या पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत होती. या प्रकरणात पूनम, संजना गुप्ता, विमलेश वर्मा आणि धर्मेंद्र प्रजापती या चौघांना अटक करण्यात आली आहे.

अविवाहीत असलेल्या आणि लग्न करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांची माहिती मिळवायची. लग्नेच्छुक असलेल्यांपैकी एखाद्या तरुणाला ठरवून जाळ्यात ओढायचे. हळू हळू तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याचा विश्वास संपादन करायचा. लग्न केल्यानंतर संधी साधून घरातील पैसा आणि सोन्याचांदीचे दागिने घेऊन पळ काढायचा, असा प्रकार सुरू होता.

पूनम आणि तिचे सहकारी यांचा कारभार बिनबोभाट सुरू होता. पण सातवे सावज अपेक्षेप्रमाणे जाळ्यात अडकले नाही. उपाध्याय नावाच्या तरुणाला पूनमने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नासाठी उपाध्यायने किमान दीड लाखांचा खर्च करावा यासाठी पूनमचे सहकारी प्रयत्न करत होते. पण संशय आल्यामुळे आयत्यावेळी उपाध्यायने पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि सगळा प्रकार उघड झाला.

Recent Posts

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

17 minutes ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

21 minutes ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

34 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

54 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

1 hour ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

1 hour ago