मुंबई: राज्यातील कडाक्याचा थंडीचा जोर कमी होत चालला असून वर्षाच्या शेवटी राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याच्या शक्यता आहे. पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा २ ते ४ अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार मराठवाडा ते मध्य महाराष्ट्रात २६ ते २८ डिसेंबरदरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच वर्षाच्या अखेरीस वादळी वाऱ्यासह गारपीटही होणार असल्याचीही शक्यता आहे.
मध्य तसेच पश्चिम भारतात पुढील २४ तासांत तापमान वाढण्यास सुरूवात होणार आहे. त्यानुसार २६ आणि २७ डिसेंबरला पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याची तीव्रता मध्य तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात असणार आहे.
२६ डिसेंबरला हवामान विभागाने धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे तर २७ डिसेंबरला नाशिक, पुणे, जळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, अमरावती, नंदुरबार, बुलढाणा, वाशिम, अकोला या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…