CM Devendra Fadanvis : ‘मला चक्रव्यूह भेदता येतो’…फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Share

नागपूर : लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह तयार करण्यात आले. परंतु विधानसभेत फेक नरेटिव्ह फॅक्टरी उद्धवस्त करण्याचे काम राज्यातील जनतेने केले. विधानसभा निवडणुकीत ६६.०५ टक्के मतदान झाले. त्यातील महायुतीला ५० टक्के मते मिळाली. इतिहासात इतकी मते कधी कोणाला मिळाली नाही. आम्ही तुमचे हे फेक नरेटिव्ही लोकासमोर उघड केले. मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले. त्यावेळी फडणवीसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा चांगलाच समाचार घेतला. विधानसभा निवडणुकीची आकडेवारी मांडत नाना पटोले यांना तुमची फेक नरेटिव्ह फॅक्टर आम्ही बंद केल्याचा टोला फडणवीसांनी लगावला.

शरद पवारांना थेट प्रश्न?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वात जास्त आश्चर्य वाटले मला शरद पवार साहेबांचे. ईव्हीएमवर कधी पवार साहेबांनी वक्तव्य केले नव्हते. परंतु आता त्यांनी ईव्हीएमबाबत धक्कादायक वक्तव्य केले. ते म्हणाले ईव्हीएममध्ये अशी सेटींग केली आहे की छोटी राज्य आम्ही जिंकू, मोठी राज्य तुम्हाला मिळणार. मग कर्नाटक काय छोटे राज्य आहे का? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.

मारकडवाडीतील आंदोलनावरुन घेरले

मारकडवाडी गावातील मतपत्रिकेवरुन देवेंद्र फडवणीस यांनी मतदानाच्या आंदोलनावरुनही विरोधकांना उत्तर दिले. फडणवीस म्हणाले, २०१४ ची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांना ५३३ मते मिळाली. सदाभाऊ खोत यांना ६६४ मते आहेत. त्यानंतर लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये झाली. त्या निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकर यांना ९५६ मते मिळाली. तर संजय मामा शिंदे यांना ३०० मते आहेत. सर्वच आकडेवारी माझ्याकडे आहे, असे त्यांनी म्हंटलं.

देवेंद्र फडणवीस यांनी मारकवाडीत राम सातपुते यांनी केलेल्या कामाचे उदाहरण सांगितले. ते म्हणाले, राम सातपुते यांच्यासारखा सामान्य कार्यकर्ता ५ वर्ष राबतो. मारकडवाडीत एकट्या राम सातपुते यांनी २२ कोटीची कामे केली. त्यांना मारकवाडीत जास्त मते मिळाली. त्यानंतर गावातील लोकांना तुम्ही धमकावत आहात. त्याबाबतची ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. ही कोणती लोकशाही आहे? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. त्या गावातील लोकांना सांगितले, गावात घेण्यात आलेल्या मतपत्रिकेच्या मतदानावर पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाले पाहिजे. ही कोणती पद्धत आहे. ही दादागिरी लोकशाहीत खपवून घेतली जाणार नाही, असे फडणवीस यांनी म्हंटलं.

Recent Posts

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

33 minutes ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

56 minutes ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

5 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

5 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

6 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

6 hours ago