मुंबई:मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियासमोर बुधवारी मोठा अपघात घडला. येथे ८० प्रवासी आणि चालक दलासह ५ जणांना घेऊन जाणारी बोट पलटली. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला ७७ जणांना वाचवण्यात यश आले. तर काहीजण अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
यात दिसत आहे की नौदलाची एक बोट वेगाने या बोटीच्या दिशेने येते आणि जोरदार धडक देते. मीडियाच्या रिपोर्टनुसार यात ७७ जणांना वाचवण्यात यश आले आहे तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. नीलकमल नावाची ही प्रवाशांना घेऊन गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाच्या दिशेने जात होती.
सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदल आणि तटरक्षक दलाच्या जवानांनी मोठ्या प्रमाणात अभियान सुरू केले. यात नौदलाच्या ११ बोटी आणि मरीन पोलिसांच्या तीन बोटींचा तसेच तटरक्षक दलाच्या एका बोटीचा यात समावेश होता. तसेच बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी चार हेलिकॉप्टरचा समावेश आहे.
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…