नागपूर : महायुतीच्या नवनिर्वाचित सरकारमधील 39 सहकाऱ्यांचा शपथविधी सोहळा आज, रविवारी नागपुरात पार पडला. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी या लोकप्रतिनिधींना राजभवनात पद व गोपनियतेची शपथ दिली.
राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २० मंत्रिपदे आली आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदेंसह १२ जणांना मंत्रिपदे मिळली आहेत. तर राष्ट्रवादीला अजित पवारांसह १० खाती मिळणार आहेत. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या 6 जणांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आलीय. नागपुरात झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये भाजपच्या १९ शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
यावेळच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक जुन्या चेहऱ्यांना डच्चू देण्यात आला असून पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळेंचे मंत्रिमंडळात कमबॅक झाले आहे. भाजपतर्फे शपथ घेणाऱ्या लोकप्रतिनिधींमध्ये आमदार नितेश राणे, शिवेंद्र राजे भोसले, चंद्रकांत पाटील, पंकज भोयर, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, अतुल सावे ,जयकुमार गोरे, माधुरी मिसाळ, चंद्रशेखर बावनकुळे, संजय सावकारे, अशोक उईके, आकाश फुंडकर आणि आशिष शेलार यांचा समावेश आहे.
शिवसेनेतर्फे शपथ घेणाऱ्यांमध्ये उदय सांमत, प्रताप सरनाईक, शंभूराज देसाई, योगश कदम, आशिष जैस्वाल, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, दादा भूसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट यांचा समावेश आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तमामा भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांनी पद व गोपनियतेची शपथ घेतली.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…