वाहतो ही दुर्वांची जुडी’ची ६० वर्षे…

Share

राज चिंचणकर

मराठी रंगभूमीवर विविध प्रकारच्या नाट्यकृती येत असल्या आणि त्यातून रसिकांचे मनोरंजन होत असले; तरी काही नाट्यकृती मात्र संस्कारक्षम म्हणून कायम ओळखल्या गेल्या. यातलीच एक माईलस्टोन नाट्यकृती म्हणजे ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’. नवाक्षरी शीर्षक ही ज्यांच्या नाटकांची खासियत होती, असे ज्येष्ठ रंगकर्मी बाळ कोल्हटकर यांच्या या नाटकाने रसिकजनांवर योग्य संस्कार घडवण्याचे कार्य करून ठेवले असून, यंदा या नाटकाला तब्बल ६० वर्षे झाली आहेत.

बाळ कोल्हटकर यांच्या लेखणीतून उतरलेली ही ‘दुर्वांची जुडी’ सन १९६४ मध्ये प्रथम रंगभूमीवर आली. या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगात स्वतः बाळ कोल्हटकर यांच्यासोबत आशा काळे यांनी भूमिका रंगवली होती. त्यांच्यासमवेत गणेश सोळंकी, अनंत मिराशी आदी कलावंतही या नाटकात होते. त्यावेळी या नाटकासाठी लेखक, दिग्दर्शक व संगीत दिग्दर्शक अशी तिहेरी जबाबदारी स्वतः बाळ कोल्हटकर यांनी सांभाळली होती. नाट्यपंढरी सांगलीच्या भावे नाट्यमंदिरात या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. ‘नाट्यमंदिर’ या नाट्यसंस्थेने रंगभूमीवर आणलेल्या या नाटकातल्या सुभाष, पठाण, बाळू आपटे, रंगराव आदी पात्रांनी रसिकजनांवर मोहिनी घातली होती.

त्यानंतरच्या काळात इतर काही संस्थांनी हे नाटक रंगभूमीवर आणले. सन १९८४ मध्ये विजय गोखले आणि निवेदिता सराफ यांच्या अभिनयाच्या माध्यमातून हे नाटक रंगभूमीवर आले होते. दहा वर्षांपूर्वी, म्हणजे या नाटकाने जेव्हा वयाची पन्नाशी गाठली; तेव्हा अंशुमन विचारे आणि शलाका पवार या दोघांनी या नाटकात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. मूळ तीन अंकी असलेले हे नाटक तेव्हाही परंपरा राखत थेट तीन अंकात सादर झाले होते.

Tags: drama

Recent Posts

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

22 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

55 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

2 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago