साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, मारहाणीत ३ जखमी

Share

सातारा : सातारा जिल्ह्यात एका रेव्ह पार्टीचा भांडाफोड झाला असून सोशल मीडियावर या पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत. साताऱ्याच्या कास पठारावरील एका हॉटेलमध्ये बारबालांसह ही रेव्ह पार्टी सूरु होती. या रेव्हपार्टी दरम्यान झालेल्या भांडणामध्ये 3 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, कुठलीही पोलीस कारवाई होत नसल्याने या पार्टीला सातारा पोलिसांचा पाठिंबा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, साताऱ्यातील कास परिसरात एका हॉटेलवर नुकतीच एक रेव्ह पार्टी झाली. या रेव्ह पार्टीत बारबाला सुद्धा नाचवल्या गेल्या आहेत. पार्टीत दारू पिऊन धिंगाणा घालतानाचे बारबालांसोबत अश्लील नृत्य करतानाचे व्हिडिओ सध्या सोशलमिडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे या रेव्ह पार्टीनंतर या ठिकाणी वाद होऊन राडा देखील झाला आहे. त्यामध्ये, तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

साताऱ्यातील रेव्ह पार्टीच्या या घटनेचे व्हिडिओ तीन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत असतानाही पोलिसांनी सपशेल डोळेझाक केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, पोलिसांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केलंय हा अशी शंका उपस्थित होत आहे.दरम्यान, याबाबत सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याशी संपर्क साधल्यानंतर प्रकरणाची चौकशी सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे, पोलीस चौकशीतून काय बाहेर येते ?हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच, पोलीस तपास किती जलद गतीने होतो हेही पाहावे लागणार आहे.

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

3 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

3 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

4 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

4 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

4 hours ago