Narayan Rane : सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा पुन्हा सुरु करा!

Share

खासदार नारायण राणे यांची वाहतूक मंत्र्यांकडे मागणी

मुंबई : मुंबईहून थेट तळकोकणात जाण्यासाठी तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा (Mumbai-Sindhudurga Airport) सुरू करण्यात आली होती. मात्र २६ ऑक्टोबर रोजी मुदत संपल्यानंतर चिपी-मुंबई विमानसेवा बंद करण्यात आली. परंतु लाखो पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या या विमानसेवेला कोकणवासीयांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी ही विमानसेवा पुन्हा सुरु करावी अशी मागणी नागरी विमान वाहतूक मंत्र्याकडे केली आहे.

खा. नारायण राणे यांनी वाहतूक मंत्र्यांकडे विमानसेवेबाबत जारी केलेल्या निवेदनानुसार मुंबई – चिपी (सिंधुदुर्ग विमानतळ) अशी कार्यान्वित असलेली सेवा खूप चांगली होती. सणासुदीच्या काळात तसेच अन्य वेळीही मोठा फायदा प्रवाशांना आणि पर्यायाने कंपनीला होत असायचा. हंगामाच्या वेळी तर एका मार्गासाठी २५ हजारापर्यंत तिकीट देऊन प्रवाशांनी प्रवास केला आहे. या दरम्यान कधीकधी हवामान, तसेच अन्य तांत्रीक कारणामुळे विमानसेवा विस्कळीत झाल्याने त्याचा फटका प्रवाशीसंख्येवरही झाला. परंतु फ्लाइट नेहमीच बुक केल्या गेल्या.

पर्यटक, स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा त्वरीत कार्यरत व्हावी, अशी मागणीही खा. नारायण राणे (Narayan Rane) यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के.राम मोहन नायडू (Ram Mohan Naidu) यांच्याकडे केली आहे.

Recent Posts

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

9 minutes ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

13 minutes ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

26 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

46 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

1 hour ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

1 hour ago