नवी दिल्ली : नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर काल ‘फेंगल’ चक्रीवादळात (Fengal Cyclone) झाले होते. तर आगामी २४ तासात हे चक्रीवादळ अधिक तीव्र होत तामिळनाडूला धडकणार असल्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार आज दुपारी तामिळनाडूच्या किनारपट्टीला हे वादळ धडकणार असून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हवामान विभागाने (Meteorological Department) अलर्ट जारी केला नागरिकांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपाऱच्या सुमारास फेंगल’ चक्रीवादळ करैकल आणि महाबलीपुरम दरम्यान किनारपट्टी ओलांडण्याचा अंदाज आहे. या वेळी ताशी अधिकाधिक ९० किमी वेगाने धडकणार असून काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळाच्या प्रभाव ३ डिसेंबरपर्यंत कर्नाटक आणि केरळवर राहण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्राच्या हवामानात बदल होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाने चेन्नई, तिरुवल्लूर, चेंगलपट्टू, कांचीपुरम, विल्लुपुरम, कल्लाकुरिची, कुड्डालोर आणि पुद्दुचेरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस आणि अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच राणीपेट, तिरुवन्नामलाई, वेल्लोर, पेरंबलुर, अरियालूर, तंजावूर, तिरुवरूर, मयिलादुथुराई आणि नागपट्टिनम या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तामिळनाडू आपत्ती व्यवस्थापन विभागाने २,२२९ मदत केंद्रे स्थापन करण्यात आली असून तिरुवरूर आणि नागपट्टिनम जिल्ह्यात १६४ कुटुंबांतील ४७१ लोकांना मदत छावण्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा तिरुवरूर केंद्रीय विद्यापीठाचा दौराही रद्द करण्यात आला आहे.
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…