नवी दिल्ली : भारतीय संविधान लोकशाहीचा मजबूत पाया आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Murmu) यांनी मंगळवारी केले. संविधान दिनानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संविधानाबद्दल आदर व्यक्त करुन संविधानाचे महत्व अधोरेखित केले. संविधान सदनाच्या (जुने संसद भवन) सेंट्रल हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभा सभापती जगदीप धनखड, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे मंचावर उपस्थित होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, पंच्याहत्तर वर्षांपूर्वी याच दिवशी ‘संविधान सदन’च्या याच सेंट्रल हॉलमध्ये संविधान सभेने राज्यघटना तयार करण्याचे कार्य पार पाडले. स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सर्व नागरिकांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला. पुढील वर्षी २६ जानेवारीला आपण आपल्या प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करू. अशा उत्सवांमुळे एकात्मता मजबूत होते.
भारतीय राज्यघटना ही काही महान विचारवंतांनी केलेल्या सुमारे तीन वर्षांच्या विचारमंथनाचे फलित आहे. तसेच खऱ्या अर्थाने ते आपल्या प्रदीर्घ स्वातंत्र्यलढ्याचे फलित आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यपालिका, विधिमंडळ आणि न्यायपालिका तसेच सर्व नागरिकांच्या सक्रिय सहभागातून आपल्या घटनात्मक आदर्शांना बळ मिळते, असे राष्ट्रपती म्हणाल्या. राज्यघटना हा जिवंत आणि प्रगतीशील दस्तावेज आहे.
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…