नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीचे निकाल (Assembly Election Result 2024) जाहीर झाले असून आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशनाला (Winter Session of Parliament) सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनतेला संबोधित करताना विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे.
यंदाचे संसदेच हे सत्र विशेष असणार आहे. कारण ‘देशाची राज्यघटना लिहून ७५ वर्षे पूर्ण झाली असून संसदेत आम्ही सर्वजण मिळून संविधान उत्सवाला सुरुवात करणार आहे. त्यामुळे भारतीय संविधानासारखा इतका चांगला दस्ताऐवज आपल्याला मिळाला आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
विरोधक संसदेत येवून गोंधळ घालतात, त्यामुळे अशा लोकांना जनतेनेच नाकारले आहे. तसेच नविन उर्जा, उत्साह घेऊन आलेल्या नवनिर्वाचित खासदारांना हे गदारोळ घालणारे लोक बोलू देत नाहीत. त्यांच्या आवाज दाबला जातो, त्यामुळे संसदेमधील चर्चेमध्ये सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे पंतप्रधानांनी म्हटले.
त्याचबरोबर, भारतातील मतदार लोकशाहीला समर्पित आहेत, त्यांचे संविधानाप्रती समर्पण आहे, त्यांचा संसदीय कार्यपद्धतीवरचा विश्वास आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व आदरणीय खासदारांना हे अधिवेशन उत्साहाने आणि उत्साहाने पुढे नेण्यासाठी आमंत्रित करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…