नवी दिल्ली : राजधानी दिल्ली आणि परिसरामध्ये हवा प्रदूषणाने गंभीरतेची पातळी ओलांडली आहे. प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयातील वकिलांनी दिल्लीतील न्यायालयांच्या सुनावण्या ऑनलाईन (online) घेण्याची विनंती सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडे केली. त्यांनी ऑनलाईन सर्व सुनावण्या घेण्यास नकार दिला.
प्रदूषणाची पातळी पाहता त्यांनी वकिलांना दूरदृश्यप्रणालीद्वारे हजर राहण्याची परवानगी दिली आहे. सरन्यायधीश संजीव खन्ना यांनी वकिलांना सांगितले की, ज्या प्रकरणांमध्ये दूरदृश्यप्रणालीद्वारे सुनावणीची शक्यता आहे, त्यामध्ये घेतली जाईल. दिल्लीतील गंभीर प्रदूषणामुळे भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, ज्येष्ठ वकील व सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल, ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी सरन्यायाधीशांकडे सर्व प्रकरणांच्या सुनावण्या ऑनलाईन घेण्याची विनंती केली होती.
शंकरनारायणन यांनी सरन्यायाधीशांना सांगितले की, दररोज १० हजार वकील त्यांच्या वाहनांतून प्रवास करतात. ऑनलाईन (online) सुनावण्यांमुळे यामध्ये बराच फरक पडू शकतो.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…