मुंबई: मुंबई विद्यापीठाने क्यूएस आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२५ मध्ये उल्लेखनीय प्रगती साधत ६७ वरून थेट ५२ क्रमांकावर झेप घेतली आहे. जागतिक क्रमवारीतही विद्यापीठाने २९१-३०० रँकिंग बँडमधून २४५ व्या स्थानी पोहोचत गुणवत्ता सुधारली आहे. या यशामुळे मुंबई विद्यापीठ आशियातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये आपले महत्त्वपूर्ण स्थान बजावू लागले आहे.
क्वाकरेली सायमंड्स (QS) च्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने धोरणात्मक सुधारणांना प्राधान्य देत, संस्थात्मक प्रतिष्ठा, रिसर्च आऊटपूट, वैश्विक सहभागिता यासह इतर निकषांमध्ये विशेष कामगिरी केली आहे. विद्यापीठाने यंदा १९ वरून ३४ एकूण गुण मिळवत आपला दर्जा अधिक भक्कम केला आहे.
मुंबई विद्यापीठाने पेपर्स पर फॅकल्टी या निकषात ९०.६ गुण मिळवत सर्वाधिक प्रगती साधली आहे. त्यानंतर नियोक्ता प्रतिष्ठा ६४.१, शैक्षणिक प्रतिष्ठा ३४.६, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी गुणोत्तर ३२.६, आंतरराष्ट्रीय संशोधन नेटवर्क २१.३ आणि इतर महत्त्वाच्या निकषांमध्ये उल्लेखनीय कामगिरी दर्शवली आहे. तसेच, विद्यापीठाने इनबाऊंड आणि आऊटबाऊंड एक्सचेंज स्टुडेंट कॅटेगरीमधील आपले मागील स्तर टिकवले आहे.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या सर्व घटकांनी संशोधन व विकासाच्या दिशेने सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे हे फलित आहे. भविष्यात सायटेशन पर पेपर आणि स्टुडेंट एक्सचेंज प्रोग्राममध्ये आणखी सुधारणा करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…