Amit Shah : शरद पवारांच्या कारकिर्दीत राज्यातील १०१ साखर कारखाने मृत्युपंथाला!

Share

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा घणाघात

सांगली : सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ काल सांगली येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला. ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कारकिर्दीमध्ये भ्रष्टाचारामुळे राज्यातील २०० सहकारी साखर कारखान्यांपैकी १०१ साखर कारखाने मृत्युपंथाला लागले’ अशी टीका अमित शहा यांनी केली.

सांगलीमध्ये आशिया खंडातील सर्वांत मोठा ‘वसंतदादा सहकारी साखर कारखाना’ उभारला होता. मात्र शरद पवार यांच्या कारकिर्दीत कारखाना विकण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे सहकारातील संस्था कोणी आणि कशासाठी मोडल्या, याचे उत्तर पवार यांनी द्यावे, असे अमित शहा यांनी म्हटले

त्याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र सहकारी साखर कारखान्याच्या साखरेवरील प्राप्तिकर हटवून शेतकऱ्यांना १५ हजार कोटींचा फायदा दिला आहे. तर एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण कोणत्याही स्थितीत हटवले जाणार नाही, असे सांगत त्यांनी सांगलीला लवकरच विमानतळ होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

देशाची अर्थव्यवस्था २०२७ मध्ये ती तिसऱ्या स्थानी येणार

केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर गेल्या दहा वर्षांत राज्याला १० लाख १५ हजार ९०० कोटी रुपये देण्यात आले. देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून पाचव्या स्थानी आली असून, २०२७ मध्ये ती तिसऱ्या स्थानी येईल.

राहुल गांधींनी संविधानाचा अपमान केला

मोदी सरकारच्या काळात दहशतीवादी हल्ले कमी झाले असून, देशाच्या सीमा सुरक्षित हाती आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लाल कव्हरमध्ये संविधानाचे वाटप केले. मात्र, यामध्ये आत कोरी पानेच आहेत. यामुळे संविधानाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान त्यांनी केला आहे. कोणीही संविधान बदल करू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी या वेळी दिला.

Recent Posts

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

12 minutes ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

35 minutes ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

5 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

5 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

5 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

6 hours ago