पावसातली ‘निवडणूक’ अन् दिवाळी…!

Share

कोकणात गेले दोन दिवस पाऊस थांबला आहे. दिवाळीच्या कालावधीत एक-दोन वेळा परतीचा पाऊस पडायचा हा पूर्वानुभव अलिकडे खोटा ठरत आहे. अगदी यावर्षी तर कोकणातील भातशेतीचे होणारे नुकसान पाहावं लागत आहे. कोकणातील शेतकरी हतबल आहे. महिन्याभरापूर्वी यावर्षी शेती उत्तम आहे. कदाचित बंपर तांदूळ घरात येईल असं सांगणारा शेतकरी… जे नुकसान झाले आहे ते झालेले नुकसान सोसण्यापलिकडे आपण काही करू शकत नाही. यामुळेच पावसाच्या शेतीत साचलेल्या पाण्यातून काही वाचवता येईल का? हा प्रयत्न शेतकरी करीत राहिला. ते हातात पीक येईल ते आपलं म्हणत कोकणातील शेतकरी शेतामध्ये राबत असतो. त्याच पद्धतीने कोकणातील शेतकऱ्यांने जे त्याच्या हातात पीक आलंय ते घेतलं. दिवाळीत पाऊस पडतच नाही असे नाही; परंतु यावेळी फारच पावसाने कहर केला आहे.

संतोष वायंगणकर

दररोज सकाळ-संध्याकाळ पाऊस कोसळत होता. यामुळे शेतकऱ्यांना भातकापणी आणि भाताची झोडणी अशा सर्वच बाबतीत अक्षरश: कसरत करीत कामे आटोपवावी लागली. एकिकडे हे पावसाळी वातावरण राहिल्याने नोव्हेंबर महिन्यात सुरू होणारी थंडी अद्यापपर्यंत सुरू झालेलीच नाही. दिवाळीचा अभ्यंगस्नानाचा पहिला दिवस हा कडाक्याच्या थंडीचा असायचा. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी प्रचंड पडलेली कडाक्याची थंडी या अशा थंडीच्या वातावरणातील अभ्यंगस्थान आणि तुळशी वृंदावनासमोर निरांजनाच्या किंवा समईच्या मंद ज्योतीच्या साक्षीने कारीट फोडणे, त्यातल्या दोन-चार कारटाच्या बिया तोंडात टाकणे तो कडवटपणा नकोसा होणारा; परंतु कुटुंबातील ज्येष्ठांकडून, आई-वडिलांकडून होणाऱ्या आग्रहाने तो कारटाचा कडवटपणाही गोड मानून गरमा-गरम कांदा-पोहे आणि आई, वहिणी, बहिणींच्या हातचा घरातला लाडू, चिवडा, चकली, चण्याचं पीठ आणि गूळ घालून बनवलेली करंजी असा सकाळच्या प्रहरी नाश्ता करूनच दिवाळी सणाचा शुभारंभ व्हायचा. आजही यात फार बदल घडला असे नाही; परंतु अलिकडे तयार मिळणारा फराळ बाजारात जागो-जागी उपलब्ध असतो; परंतु घरात आई-बहिणींच्या हातच्या फराळाची चव कशाला येऊच शकत नाही.

बदलत्या स्थितीत गावातली दिवाळी आणि शहरांमधली दिवाळी हा मोठा फरक फार पूर्वीपासून आहे. गावातून फटाक्यांची आतषबाजी किंवा विद्युत रोषणाई नसते; परंतु पहाटेच्या अभ्यंगस्नानाला पहिलं कारीट कोणी फोडलं यात मात्र जोरदार स्पर्धा असायची. ‘गोविंदा रे गोपाळा’ अशी गावातल्या वाडीत पहिली आरोळी कोणी ठोकली यावरून स्पर्धा असायची आणि मग पहाटे पहिला कोण उठला यातही सकाळी एक दुसऱ्याकडे फराळ करताना आपल्या कोकणात खूप गजाली व्हायच्या. अलिकडे हे वातावरण राहिले नाही. सर्वसाधारणपणे वातावरणातील बदलाचा परिणाम निश्चितपणे होत आहे. या वर्षीची दिवाळी ही महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या वातावरणातच होत आहे. दिवाळीच्या या पंधरवड्यातच राज्यातील निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुका दिवाळीत होत असल्याने निवडणूक प्रचार करणाऱ्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनाही अतिशय आनंदी, उत्साही वातावरणात निवडणूक प्रचारही होताना दिसतो. कोकणात तीन-चार मतदारसंघांत चौरंगी, तिरंगी, पंचरंगी लढत होत आहे. यामुळे साहजिकच निवडणुकीतील वातावरण ढवळून निघत आहे. खरंतर कोणत्याही निवडणुका या विकासाच्या मुद्यावर लढवल्या गेल्या पाहिजेत. आपल्या सत्ता काळात कोणती विकासकामे झाली. समाजहिताचे कोणते निर्णय सरकारने घेतले.

सरकारने घेतलेल्या निर्णयांचा फायदा सर्वसामान्य जनतेला कसा होऊ शकला याची मांडणी झाली पाहिजे; परंतु आपण काय काम केले. जनतेच्या हिताचे कोणते निर्णय घेतले हे ज्यांना सांगता येत नाहीत किंवा सांगण्यासारखं काही नसते ते नेते, पुढारी वैयक्तिक टीका करत राहतात.कोकणातील कोणत्याही निवडणुका असल्या तरीही ‘राणे’ टार्गेट केले जातात. कोणत्याही निवडणुकीत राणे हेच टीकेंच्या केंद्रस्थानी असतात. वैयक्तिक स्वरूपात त्यांच्यावर टीका केली जाते. यामध्ये कोकणातील हे देखील एक सत्य आहे की विरोधकांकडून राणेंवर कितीही टीका झाली तरी निवडणुकीत निवडून मात्र राणेच येतात. यामुळे कोकणातील निवडणुका म्हटल्या की, विकासावरची चर्चा केलेली विकासकामे यावर चर्चाच होताना दिसत नाही. कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांमध्ये एकिकडे अधून-मधून येणारा पाऊस, शेतात धावपळीत असणारा शेतकरी आणि त्याचवेळी निवडणुकीचे असलेले वातावरण या निवडणुकीचा प्रचार, शेतकऱ्यांच्या, ग्रामस्थांच्या, कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या गाठीभेटी, होणारा संवाद, वैयक्तिक संवादावरच यावेळच्या निवडणुकीत भर देण्यात आला आहे. यामुळे एकिकडे मध्येच पावसाळी वातावरण, निवडणुकीचे कार्यकर्ते, पुढारी यांची धावपळ आणि दिवाळीतील उत्साही वातावरण अशा या वातावरणात कोकणवासीय शेतीची कामे, दिवाळीच्या फराळाचा आस्वाद आणि निवडणुकीतील टीकाटिपणीचे फटाके याचा आनंद घेत आहेत.

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

4 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

4 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

4 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

4 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

5 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

6 hours ago